नवी दिल्ली (वंदना बर्वें) – राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या भरघोष जनादेशामुळे भाजपमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असले तरी भाजपच्या बुथ मॅनेजमेंटच्या नियोजनाला देखील देण्यात येत आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढची जबाबदारी घेतल्यामुळे देखील भाजपला हे यश मिळाले असल्याची चर्चां राजधानीतील राजकीय वर्तुंळात रंगली आहे.
दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेेस पक्षाजवळ मोदींच्या चेह-याला मात देऊ शकेल असा कुठलाही चेहरा वा नेता नाही. यामुळे भाजपचा विजयीरथ वेगाने देशभर धावताना दिसून येत आहे. शिवाय अमित शहा यांच्या चाणक्यनितीला उत्तर देणारे नियोजनाचा अभाव असल्यामुळे निवडणुकीमध्ये वारंवार हार पत्करावी लागते.
छत्तीसगढमध्ये निरुत्साही भाजप कार्यंकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करुन त्यांना जोमाने कामाला लावण्याचे काम शहा यांनी केले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. तर मध्य प्रदेशमध्ये देखील अंतर्गत कलहावर मात करुन भाजपला अभुतपुर्व यश मिळवुन देण्याचे श्रेय शहा यांच्या नियोजनाला देण्यात येत आहे, हे विशेष. या राज्यामध्ये भाजपने बुथ मॅनेजमेंटच्या माध्यमातुन केलेले कार्य देखील उल्लेखनीय आहे. यामुळे मोदींचा प्रभाव आणि शहा यांचे नियोजन या जोडीला भरघोष यश मिळविणारी जोडी म्हणून भाजपच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात उल्लेख केला जाइल.
मध्य प्रदेशात जवळपास ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक जागेवर लक्ष केंद्रीत करुन निवडणुकीच्या मैदानात शहा सक्रीय झाले होते. प्रत्येक जागेसाठी वेगवेगळी रणनिती आखण्यात आली होती. याच आधारावर उमेदवारांची निवड करण्यात आली होती. पक्षातील मोठया नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची भुमिका देखील शहा यांनीच पक्षाच्या सभेत मांडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अगदी सुरुवातीलाच उमेदवारांची यादी जाहीर करणे देखील राजकीय डावपेचांच एक भाग होता. मध्य प्रदेश पेक्षा एकदम वेगळी परिस्थिती छत्तीसगडमध्ये होती. येथे देखील महादेव अॅप घोटाळयाचा पुरेपूर उपयोग करीत योग्य वेळी योग्य गोष्टी केल्यामुळे भाजपच्या पदरात यश पडले असल्याचे जाणकारंाचे म्हणणे आहे. एकुणच भाजपच्या रणनितीमुळे विरोधकांचे मनोबल कमजोर पडल्यामुळे भाजपला निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केले, यात दुमत नाही.