नवी दिल्ली – क्रीस्तोफर नोलनचा चित्रपट ‘ओपेनहायमर’ 21 जुलै रोजी भारतासह जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, चाहते रुपेरी पडद्यावर ही कथा पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र भारतात चित्रपट प्रदर्शित होताच काही दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. आता याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाष्य केल्याचे समजते.
‘ओपेनहायमर’ या हॉलिवूड चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटातील अडल्ट सीन दरम्यान भगवत गीतेचा मजकूर बोलतानाचा सिन शूट करण्यात आला आहे.ही बाब समोर येताच हा वाद आणखी वाढला आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याप्रकरणी सेन्सॉर बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे.
There is no historical evidence that J Robert #Oppenheimer used to receive Bhagvad Geeta Paath lessons from his sex-partners during sex.
Woke Hollywood has no reason to give any more value to Geeta than a petty prop.
But why is Bharat so comfortable with this? pic.twitter.com/OTcmkUkwbI
— Gems of Bollywood बॉलीवुड के रत्न (@GemsOfBollywood) July 21, 2023
एका इंग्रजी मीडिया समूहाने दिलेल्या वृत्तानुसार,अनुराग ठाकूर यांनी हा सीन तातडीने चित्रपटातून काढून टाकण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे देखील समजते. या वादानंतरही हा चित्रपट जगभरात बऱ्यापैकी कमाई करण्यात व्यस्त असून प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. मात्र सोशल मीडियावर या विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अनुराग ठाकूर यांनी या सिनबाबत सेन्सॉर बोर्डाला खडसावल्यानंतर आता या सीनला कात्री लागण्याची शक्यता आहे.
MOVIE OPPENHEIMER’S ATTACK ON BHAGWAD GEETA
Press Release of Save Culture Save India Foundation
Date: July 22, 2023
It has come to the notice of Save Culture Save India Foundation that the movie Oppenheimer which was released on 21st July contains scenes which make a scathing… pic.twitter.com/RmJI0q9pXi
— Uday Mahurkar (@UdayMahurkar) July 22, 2023
काय आहे चित्रपटात नेमकं
‘ओपेनहायमर’ हा चित्रपट भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आणि शोधांवर आधारित आहे. जे. रॉबर्ट हे अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात. हा चित्रपट पहिला अणुबॉम्ब तयार करण्याचे श्रेय मिळालेल्या भौतिकशास्त्रज्ञाचा उदय आणि पतनाचे वर्णन करतो.