अमरावती – वाढती लोकसंख्या हे देशासमोरीलमोठे आव्हान आहे. त्या अनुषंगानेआरोग्य विभागाच्या वतीने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी नागरिकांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रमराबवण्यात येतात. परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसंदर्भात अजूनही भीती असल्याने पुरुषांचे प्रमाण कमी आहे.
मागील वर्षभरात जिल्ह्यात १ हजार७०४ शस्त्रक्रिया झाल्यात. परंतु यामध्ये पुरुषांची संख्या फक्त ४७ आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या ही २०११च्या जनगणनेनुसार २८ लाख ८७हजार ८२६ इतकी होती; परंतु गेल्या १२ वर्षांमध्ये ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.
पुरुष नसबंदीविषयी अनेक गैरसमज असल्याने नसबंदी शस्त्रक्रिया केली तर आपले पुरुषत्व जाईल, अशी भीती पुरुषांना वाटते. तसेच पुरुष घरात कर्ताअसतो आणि शस्त्रक्रियेमुळे तो अशक्त होईल, असा गैरसमज पुरुषांमध्ये असल्याने या शस्त्रक्रियेसाठी आजही पुरुषांची संख्या कमी आहे.
मागील वर्षभरात १ हजार ७०४ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यात ४७ पुरुषांच्या शस्त्रक्रिया आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत पुरुषांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
– डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी.