श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचे चित्र रंगवणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालावर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या अहवालातून खोटेपणाचा दर्प येत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपकडून केल्या जाणाऱ्या लबाडीच्या राजकारणाने केंद्रीय गृह मंत्रालयालाही खालच्या पायरीवर आणल्याची बाब धक्कादायक आहे.
#विश्वमराठीसंमेलन२०२३ : मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही – मराठी भाषा विभाग मंत्री केसरकर
ताज्या अहवालामुळे एकेकाळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेतृत्व केलेल्या गृह मंत्रालयाची अपकिर्ती झाली आहे, अशी टिप्पणी मेहबुबा यांनी ट्विटरवरून केली. केवळ तीन परिवार असा जम्मू-काश्मीरमधील लोकशाहीचा याआधी अर्थ होता, असे अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यावरून मेहबुबा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचे पुत्र जय यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
आमच्या घराण्यांनी कठोर मेहनत घेतल्यानेच आम्ही सध्या आहोत तिथे आहोत. आम्ही बीसीसीआयचे नेतृत्व करण्यासाठी हवेतून खाली उडी घेतलेली नाही, असे त्यांनी म्हटले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून जय शहा कार्यरत आहेत. त्याचा संदर्भ मेहबुबा यांनी दिला.