सामाजिक : ग्रामपरिवर्तक म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कार्यरत
नाणे मावळ – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या कान्हे गावातील एका शेतकरी कुटुंबातील 25 वर्षीय शुभम गुलाब सातकर या हरहुन्नरी तरुणाचा जन्म झाला. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व सामाजिक सुधारणा करण्यासाठी शिक्षणाच्या जोरावर तो मुख्यमंत्री ग्रामविकास दूत बनला. आज तो एक कार्यकर्ता ग्रामपरिवर्तक म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काम करत आहे. त्याच्या या लहान वयातील जीवनप्रवासाचा, ध्येय गाठण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नाचा आढावा दैनिक प्रभातने घेतला आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे आज फक्त एक अभियान राहील नसून, ती एक लोकचळवळ बनत चालली आहे आणि त्याच चळवळीचे कार्य आज माझी ओळख सुद्धा होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणून आजपर्यंत जाणवलेल्या ग्रामीण समस्या समजून घेऊन बदलू शकणाऱ्या गोष्टी बदलवण्यासाठी प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता ग्रामपरिवर्तक म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कार्य करीत आहे.
ग्रामीण भागात काम करत असताना कृषी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व उपजिविका आदी क्षेत्रात चौफेर काम करता आले. आयुष्य समृद्ध करणारे अनेक नवे नवे अनुभव आज मिळत आहेत ते केवळ या अभियानाचा एक भाग असल्यामुळे महाविद्यालयीन वयात आपण देशसेवेच, समाजसेवेच आपल्या ग्रामीण भागाच्या प्रगतीच स्वप्न पाहतो आणि पुढच्या एक ते दीड वर्षात तेच काम आपली ओळख बनून जाते. हीच बाब आज प्रकाश देत वाटा उजळून टाकीत आहे.
मागे वळून पाहताना भौतिक व पायाभूत सुविधांबरोबरच गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करणे असेल, सेंद्रीय शेती, विषमुक्त व आरोग्यदायी भाजीपाला करिता परसबागांच्या माध्यमातून करता आलेले प्रयत्न असोत ही कामे समाधान देतात.
त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची उपचार असेल, उमेदच्या माध्यमातून महिला बचत गट पुनरुज्जीवण व सक्षमीकरण, सौभाग्य-उज्ज्वला योजनांच्या माध्यमातून 100 टक्के घरांमध्ये वीज व गॅस, अस्मिता योजनेची अंमलबजावणी, अनेक प्रशिक्षण कार्यक्रम, संपूर्ण शाळा डिजिटल कार्यक्रम, ब्रॅंड करून शेतमालाची विक्री, मधुमक्षिका पालनच्या माध्यमातून आर्थिक स्वयंपूर्णता अशा प्रकारची अनेक कामे तडीस नेता आली.
ग्रामीण भाग अजूनही आश्वासक…
वयाच्या पंचविशीपूर्वीच हातून घडलेल्या कार्याकडे पाहताना आता असं वाटत की या कार्यात दिसलेल्या आश्वासक आवाहनाची अजून आपल्याकडून पूर्णपणे पूर्तता झालेली नाही. ही बाब अस्वस्थ करत राहते आणि या सर्वाची जबाबदारी तर मी स्वीकारतोच. पण सततचा अपूर्णतेचा अनुभव मान्य करणे म्हणजे उदास होऊन थांबून जाण नाही. अस्वस्थता आणि उदासीनता यातली सीमारेषा ही सततच्या कार्यप्रवण असण्यातून आखली जाते. तसे काम आता देखील चालू आहे आणि या अस्वस्थतेत नवी ऊर्जा भरण्यासाठी या खेड्यापाड्यातील लोकांसाठी करत असलेल काम त्यांना समाधान देत आहे, एवढं पुरेसे आहे, असेही शुभम सांगायला शुभम सातकर विसरला नाही.