नगर -वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. माऊली सेवा प्रतिष्ठानच्यावतीने केडगाव परिसरामध्ये प्रत्येक वर्षी 200 रोपांची लागवड करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम नागरिकांच्या सहकार्याने केले जाणार आहे, असे प्रतिपादन माऊल जाधव यांनी केले.
आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्तशिवाजीनगर परिसरात 200 वृक्षांची लागवड केली. यावेळी संतोष गवळी, विजय जाधव, बादल जैस्वार, अजय आजबे, आनंद मांढरे, महेश आजबे, गौरव नागापुरे, सूरज खताडे, भाऊ तेलोरे, पवन जाधव, साखरबाई आंधळे, नंदा नागापुरे, उज्वला जाधव, पल्लवी अंकुश, आशा कोहक, ज्योती जाधव आदी उपस्थित होते.