चेन्नई – तामिळनाडूतील तंजोर जिल्ह्यात रथ मिरवणुकीदरम्यान विजेचा तारेचा रथाला संपर्कात आल्यामुळे विजेचा धक्का लागून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या भीषण अपघातात 15 जण जखमी झाले आहे. मंदिरात 94 वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात होता त्यावेळी रथाची मिरवणुक काढण्यात आली होती दरम्यान ही घटना घडली.
Tamil Nadu | At least 10 people died after a temple car (of chariot festival) came in contact with a live wire in the Thanjavur district. More details are awaited. pic.twitter.com/clhjADE6J3
— ANI (@ANI) April 27, 2022
जखमींना तात्काळ तंजोर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रथयात्रेदरम्यान भाविक रस्त्यावरून जात असताना वरून जाणाऱ्या विजेचा तार रथाच्या संपर्कात आल्याने रथावर विद्युत प्रवाह पसरल्यामुळे ही घटना घडली. या घटनेची महिती मिळताच घटनास्थळी अधिकारी पोहोचले व त्यांनी मदत आणि बचाव कार्य केले. अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
मिरवणुकीदरम्यान रथ एका उघड्या विद्युत तारेला लागला, त्यानंतर हा अपघात झाला. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाल्याचे पोलीस अधिकारी व्ही बालकृष्णन यांनी सांगितले.
पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मंदिरात 94 वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात होता त्यावेळी मंगळवारी रात्रीपासूनच आजूबाजूच्या परिसरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान रथ वळवला जात असताना वरून जाणाऱ्या विजेच्या तारेचा त्याचा संपर्क आला. त्यामुळे रथात उपस्थित असलेल्यांना विजेचा धक्का बसला.