नवी दिल्ली -कंगना राणावतने एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना थोडासा आदर ठेवला पाहिजे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अभिनेता- गायक मनोज तिवारी यांनी तिला सुनावले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते.
ती अनेकदा विविध सामाजिक विषयावर बेधडकपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाला ट्रोलही केले जाते. पण या कशाचाही विचार न करता कंगना उघडपणे तिचे मत मांडते. नुकतंच गायक आणि खासदार मनोज तिवारी यांनी कंगनाला एक सल्ला दिला आहे.
ती अनेकदा तिच्या ट्विटद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत असते. तर दुसरीकडे ती महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करताना दिसते. या संपूर्ण प्रकरणावरुनच मनोज तिवारी यांनी कंगनाला खडे बोल सुनावल्याने त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.