manoj jarange patil : राज्यात मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) त्यांचा दौरा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) एक मोठं विधान केल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडली. सरकारवरही त्यांनी टीकेची तोफ डागली.
यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) म्हणाले, “मनोज जरांगे (manoj jarange patil) यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण कधीही मिळणार नाही. हे मी मनोज जरांगे पाटील यांना आधीच सांगितले आहे.
मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.
मात्र, आता त्यावर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना सणसणीत उत्तर दिलं आहे. त्यासोबतच जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील त्यांनी शोधावं, असंदेखील मनोज जरांगे म्हणाले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, “माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं आणि मलादेखील सांगावं. या आंदोलनामागे कोणाचाीह हात नसून ही मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्याची लेकरं मोठे व्हायला लागले. त्यांचं कल्याण व्हायला लागलं की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते.
आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. त्यासोबतच मराठआ समाजाला स्पष्ट माहित झालं आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत, असं ते म्हणाले.