पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही-बॅनर्जी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच भाजप आणि तृणमुल कॉंग्रेसमध्ये शाब्दिक चकमक होताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पश्चिम बंगालचा दौरा झाला त्यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यांच्या या हल्ल्याला अखेर ममता बॅनर्जी यांनीही प्रत्युत्तर देत मौन सोडले आहे. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा भाजपला दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपा-तृणमूल कॉंग्रेस यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहेत. अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर पलटवार केला. एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, बंगालची भूमी जीवना स्त्रोत आहे. आपल्याला ही भूमी सुरक्षित ठेवावी लागेल. आपल्याला याचा अभिमान बाळगावा लागेल. बाहेरून येणाऱ्यांनी म्हणावं की, ही भूमी गुजरातसारखीच होऊन जाईल, असं व्हायला नको. आमचा हाच संदेश आहे की, आम्ही सगळ्यांसाठीच आहोत. मानवता सगळ्यांसाठीच आहे. मग तो शीख असो, जैन असो वा ख्रिश्चन. आम्ही त्यांच्यामते फूट पाडण्याची परवानगी देणार नाही, असं म्हणत ममतांनी भाजपावर टीका केली.
राष्ट्रगीत आणि जय हिंदचा नारा पश्चिम बंगालमधून देण्यात आला. बंगाल सर्वोकृष्टतेला महत्त्व देतो. आम्ही बंगालला गुजरातसारखं करण्याची सहमती देऊ शकत नाही,असे त्या म्हणाल्या. अलिकडेच तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यावरही ममतांनी निशाणा साधला.
राज्यातील राजकारणात गद्दारांना कोणतेही स्थान नाही. कोटई कोणत्याही परिवाराची जहागिरी नाही. समुद्रात दोन भांडी काढलं तर काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीका केली.