जालना – राज्याचा विकासाचा गाडा हा पुढे चालत राहिला पाहिजे. यासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रयत्न करत आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारावेळी ते बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले, राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका आहे.
स्थानिक पातळीवर जरी आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. मात्र, राज्य व्यवस्थीत चालले पाहिजे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयान जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा झाल्याचे ते यावेळी म्हणाले.