मुंबई – आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच टशन पाहायला मिळाली. काल सभागृहाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. दोन्हीही बाजूचे आमदार आपापसात भिडल्यानंतर आज सकाळी शिंदे गटाच्या आमदार्नकडून पोस्टरबाजी करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा सतथाधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसून आले.
“पन्नास खोके, चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा… नाहीतर खुर्च्या खाली करा… महाराष्ट्र के गद्दारों को, जुते मारो सालों को… गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचा धिक्कार असो… ईडी सरकार हाय हाय… पैसा आमच्या जनतेचा, नाही कुणाच्या बापाचा… शेतकऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकारचा निषेध असो… सातवा वेतन न देणार्या सरकारचा धिक्कार असो… एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बलात्काऱ्यांचा सत्कार करणार्या सरकारचा धिक्कार असो… अशी तुफान घोषणाबाजी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.
पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांकडून यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. #mansoonsession2022 #पावसाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/14ZrPHXf1E
— NCP (@NCPspeaks) August 25, 2022
कुपोषणाच्या मुद्द्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराच्या निषेदार्थ विरोधकांनी सभात्याग केला. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.