भुवनेश्वर – भुवनेश्वर येथे संपन्न झालेल्या 40 व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सलग सातव्यांदा विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदित्य कुदळे आणि अश्विनी शिंदे या खेळाडूंनी अनुक्रमे वीर अभिमन्यू आणि जानकी पुरस्कार मिळवले.
कुमार गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा 19-8 असा पराभव करत विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या कुमार संघाने या स्पर्धेच्या या गटातील तब्बल 32 वे विजेतेपद साजरे केले. आदित्य (2.30 मि. आणि पाच गडी), सूरज झोरे (नाबाद 3.40 मि. आणि दोन गडी), किरण वसावे (3.10 मि. आणि 1 गडी) आणि विवेक ब्राह्मणे (3 गडी) या खेळाडूंनी विजयात मोलाचा वाटा उचलला.
कुमारी गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने कोल्हापूरचा 12-9 असा पराभव केला. या गटात महाराष्ट्राने 23 वे विजेतेपद साजरे केले.
अश्विनी (3.50, 2.40 मि.), संपदा मोरे (1.30 मि. आणि दोन बळी), दीपाली राठोड (1.10 मि. आणि दोन बळी), वृषाली भोये (दोन बळी) यांनी संघाला सहज विजय प्राप्त करून दिला.