मुंबई :- एकनाथ शिंदे गटातील बरेच आमदार नाराज आहे. राष्ट्रवादीमुळे ज्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली. तीच कारणे पुन्हा त्यांच्या पुढे आणून ठेवली जात आहे.
काहींना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार होती. त्यांच्याच जिल्ह्यात ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे अशाचा असंतोष हळूहळू पुढे येईल. अस मत राष्ट्रवादी प्रदेधाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंं.
ते पुढे म्हणाले की, कोणी काही म्हणाले तरी शरद पवार साहेबांच्या आदेशाने मी प्रदेशाध्यक्ष झालेलो आहे. जोवर पवार साहेब या पदावरून बाजूला होण्याचा आदेश देत नाहीत तोवर मला बाजूला होण्याचा अधिकार नाही, असंं देखील ते
म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेब आमच्याच सोबत आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असला तरीही शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल सातारा दौऱ्यात स्पष्ट केली आहे.
थोड्याच दिसवात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पवार साहेब स्वत: दौरा सुरु करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली.