मुंबई : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले होते. तर आज पुन्हा एकदा पत्रक्र परिषद घेत रवी राणा यांनी हे सरकार इंग्रजांच्या काळातील कायदे पाळतं हे महाराष्ट्राचंच दुर्दैव आहे. असं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ते पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,’इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाचं कलम लावलं आहे. इंग्रजांनी हे कलम आणलं होतं. अनेक महापुरुषांवर हे कलम लावलं. तेच कलम आम्हाला लावलं.’
रवी राणा पुढे म्हणाले,’उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे. म्हणून हनुमान चालिसा वाचली. पण कोर्टाने आज कायद्याला स्थगिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि किरेन रिजीजू यांचे मी आभार मानतो. ठाकरे सरकार इंग्रजांचे कायदे पाळतं हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. आम्ही कोर्टाचा आदर करतो. केंद्र सरकारचे आभार मानतो.’असं रवी राणा म्हणाले