मुंबई : उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी या अंदाज पत्रकात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची शक्यता असून त्यामूळे राज्याच्या तिजोरीवर 45 हजार ते 51 हजार कोटी रुपयांचा ताण येणअर आहे.राज्यातील नव्या सरकारने 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले आहे.
या कर्जमाफीचा लाभ दोन लाखांहून अधिक नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. यावेळी सर्वाधिक म्हणजे 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ िंमळणार आहे. मागील भाजपा सेना सरकारप्रमाणेच कर्जमाफी दिल्यास 45 हजार कोटी रुपयांचा ताण येईल आणि जर सरकसकट कर्जमाफी दिल्यास 51 हजार कोटी रुपयांचा भार येईल असे एसबीआय अभ्यास टीपणांत म्हटले आहे.