कोलकाता/नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ कोलकात्यात निदर्शने करणाऱ्या जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, विद्यापीठातील प्राध्यापकांनी कुलगुरू एम. जगदेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांची गुन्हेशाखा तपास करत असून सर्व जखमी 34 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आले. रविवारचे सुरक्षा रक्षकांचे मस्टर हरवले असल्याची तक्रार प्राध्यापकांनी सोमवारी केली. पोलिसांच्या वर्तनाबाबत शंका व्यक्त केली.
ड्युटी रोस्टरप्रमाणे सुरक्षा रक्षक आपली सेवा बजावतात. मात्र साबरमती होस्टेलला रविवारी कोण नियुक्त होते याचा उल्लेख त्या रोस्टरमध्ये नाही, असे जेएनयु संघटनेचे माझी सचिव विक्रमादित्य चौधरी यांनी सांगितले. साबरमती होस्टेलमध्ये सॉरी लिहलेले चित्र लावण्यात आले होते. तेथे रक्ताचे डाग नासधुसीच्या खुणा जागो जागी दिसत होत्या.
काही बुरखाधारी हल्लेखोर प्राध्यापकांच्या निवासस्थानांच्या दिशेने धावताना मी पाहिले. तर अन्य जण आवारात धावत होते. त्यामूळे सकाळी जाऊन मी रोस्टर तपासले त्यावेळी रोस्टरमध्ये रात्रीच्या सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीच्या जागा रिक्त होत्या. प्राध्यापकांच्या निवास्थानाच्या भागातून येताना माझ्या पत्नीने पोलिस आणि महिला हेल्पलाईनशी संपर्क साधला पण कोणीही आले नाही. लोखंडी सळ्या आणि काठ्या धारदार शस्त्र्र घेऊन गूंडाच्या टोळीने पाठलाग केल्यानंतर या दोन्ही ठिकाणी माझ्या पत्नीने किमान 15वेळा फोन केला. त्यांच्याकडच्या शस्त्रांवरून त्यांना हानी पोहोचवायची होती हे स्पष्ट आहे तिने आज सकाळी पुन्हा फोन लावला पण तिला प्रतिसाद मिळअला नाही. विद्यापीठ अधिष्ठाता अथवा मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्यापैकी कोणीही प्रतिसाद दिला नाही,असे त्यांनी सांगितले.
इंग्लीश विभागाच्या प्राध्यापक सौगातो भादुरी म्हणाल्या, रविवारी हिंसाचार उफाळला असताना मी स्वत: दिल्लीचे पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांना मोबाईलवर फोन केला. मात्र त्यांनी माझे कॉल स्वीकारले नाहीत. प्रा. शुक्ल सावंत म्हणाल्या, हा हिंसाचार होत असताना पोलिस आणि सुरक्षा रक्षक दोघांशी संपर्क होत नव्हता, हा योगायोग कसा असू शकेल.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित असणारे पोलिस जखमी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट करून देत नव्हते. मी विद्यार्थ्यांना कारमधून घेऊन जाऊ असे सांगितले. त्यानंतर रुग्णवाहिकेची पहिली तुकडी एम्सकडे मार्गस्थ झाली. अनेक मोटारीतून आलेले गुंड एम्समध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकडे पहात होते,असे सावंत म्हणाल्या.
असाच दावा स्वराज पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी केला. ते म्हणाले, मला रविवारी सायंकाळी तीनदा मारहाण झाली. मध्यरात्री मला दिल्ली पोलिसांच्या निरीक्षकाने एम्स रुग्णालयात माझ्यावर हल्ला केला. एम्सच्या आवारता गुंड थांबले असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.