मुंबई – गेल्या 10 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली परिसरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अद्याप देखील कोल्हापूर आणि सांगली याठिकाणी महापुराची स्थिती कायम आहे. अशातच पूरग्रस्त बांधवांसाठी राज्यातील विविध भागातून मदतीचा हात पुढे आला आहे.
दरम्यान, या मदतीच्याकामी मराठी सिनेकलाकारही मागे राहिले नाहीत. मात्र, जगभर पसरणारा बॉलिवूड कुठं गेलाय ? बॉलिवूडकरांना हे संकट दिसत नाही का? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. “समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण… महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बाॅलीवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत ? असो, आम्ही आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू.” असा प्रश्न मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
“समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण… महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बाॅलीवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत ? असो, आम्ही आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू.” – @MNSAmeyaKhopkar pic.twitter.com/HhZYEROcuS
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 12, 2019