Lok Sabha Election 2024 – इंडिया आघाडी म्हणजे फिल्टर्ड कॉफी असून ती आता चांगली तयार झाली आहे. कॉंंग्रेसला मोडीत काढता येणार नाही, या पक्षाला पुनरागमन करण्याचा इतिहास असून कॉंग्रेस आता त्यादृष्टीने तयार होत आहे अशी प्रतिक्रीया तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी देशभरात यात्रा काढून राहुल गांधी यांनी क्रांतीकारी पाऊल उचलले असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी गेमचेंजर बनतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. । Lok Sabha Election 2024 । Shatrughan Sinhan | Rahul Gandhi
शत्रुघ्न सिन्हा यांनी इलेक्ट्रोरल बाँडला भाजपचा “सर्वात मोठा घोटाळा आणि खंडणी रॅकेट” असे संबोधले . सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणूक प्रचारात भाजपच्या या खंडणीखोरच्या राजकारणाचा पर्दाफाश करण्याची विरोधकांना चांगली संधी आहे असे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल असा दावा करून ते म्हणाले की,
जर एनडीएला सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्सचा पाठिंबा असेल तर इंडिया आघाडीला जनतेचा पाठिंबा आहे. अनेकांना वाटते की इंडीया आघाडीला सक्षम भागीदार नाहीत, पण वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्या मागे भक्कम समर्थन आहे. देशाच्या विविध भागांमध्ये विरोधी आघाडी वेग घेत आहे, असे ते म्हणाले.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव आणि इतर अनेकजण ठामपणे इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे असल्याने इंडिया आघाडीची ही “फिल्टर कॉफी” चांगली जमून आली आहे असे ते म्हणाले.
देशभरातील अनेक महत्त्वाचे नेते इंडिटा आघाडीचा भाग आहेत आणि म्हणूनच मी याला फिल्टर केलेली कॉफी म्हणतो. निवडणुकीनंतर इतर विरोधी नेतेही त्यात सामील होतील तेव्हा या फिल्टर केलेल्या कॉफीची चव अधिक चांगली होईल,असे ते म्हणाले.
आप आणि तृणमुल सारख्या पक्षांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेसच्या अनिच्छेबद्दल विचारले असता, सिन्हा म्हणाले की, कॉंग्रेस सारख्या मोठ्या आणि जुन्या पक्षाचा इंडिया आघाडीतील सहभाग महत्वाचा आणि आवश्यक आहे.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याला नाकारता येणार नाही. पुनरागमन करण्याचा या पक्षाचा इतिहास आणि ट्रॅक रेकॉर्ड आहे. २०१९ मध्ये देखील, विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागांचा वाटा कॉंग्रेस पक्षाचा होता. आम्ही पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र लढत असलो तरी आम्ही इंडिया आघाडीबरोबरच आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, जे आता इंडिया आघाडीत नाहीत किंवा वेगळे लढत आहेत याचा अर्थ असा नाही की ते निवडणुकीनंतर विरोधी आघाडीत सामील होणार नाहीत. निवडणुकीनंतर, विरोधक भाजपला हटवण्यासाठी एकत्र येतील,असेही त्यांनी नमूद केले.
भाजपचे चारशे प्लसचा दावा हास्यास्पद आहे असे नमूद करून तेम्हणाले की भाजला दीडशे ते पावणे दोनशे जागा मिळाल्या तरी खूप झाल्या अशी सध्याची स्थिती आहे. । Lok Sabha Election 2024 । Shatrughan Sinhan | Rahul Gandhi