Lok Sabha Election । देशातील निवडणूक आयोगाच्या दोन नवीन निवडणूक आयुक्तांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे बलविंदर संधू यांची नावे निश्चित करण्यात आलीय. या बैठकीत विरोधी पक्षनेते अधीर रंजनही सहभागी झाले होते. दरम्यान, निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
निवडणुकीची घोषणा होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याची मागणीही सर्व पक्षांनी केली.
अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका Lok Sabha Election ।
लोकसभा निवडणुकीसोबतच निवडणूक आयोग जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही जाहीर करणार आहे. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत काय निर्णय होणार? आगामी लोकसभा निवडणूकही 2019 प्रमाणे सात टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुका सात टप्प्यात झाल्या होत्या Lok Sabha Election ।
2019 च्या लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान 19 मे रोजी पार पडले. 2019 मध्ये 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान झाले होते. 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.
2019 मध्ये भाजपचा मोठा विजय
गेल्या निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या आणि भाजप आघाडीला एकूण 353 जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपला 37.36 टक्के मते मिळाली, तर एनडीएला 45 टक्के मते मिळाली. त्याच वेळी, काँग्रेस पक्षाने 52 जागा जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीने 92 जागा जिंकल्या. इतर पक्षांना 97 जागा मिळाल्या होत्या.