हैदराबाद: करोनाचा वाढता फैलाव आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तेलंगणा सरकारने राज्यातील लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, तेलांगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चार दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तेलंगणामध्ये 3 ऐवजी 7 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या करोनाने थैमान घातले आहे.