वाघोली – युवक, युवतींच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केले. केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांचा शिरुर लोकसभा दौरा होता. यात त्यांनी वाघोली येथे युवा व प्रथम मतदान करणारे युवा मतदारांसोबत संवाद साधला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, शिरूर लोकसभा संयोजक धर्मेंद्र खांडरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे, गणेश कुटे, प्रदीप सातव, शरद आव्हाळे, नितीन गावडे, दिनेश झांबरे, स्वप्नील उंद्रे, श्याम गावडे, उमेश मोरे, दिनेश हरगुडे, राजेंद्र राखपसरे, गौरव झुरुंगे, रोहित खैरे, गणेश सातव, दत्तात्रय हरगुडे, पुनम चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप सातव, रत्नमाला संदीप सातव यांनी केले होते.