नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यापासून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. आता पक्ष सोडण्याच्या तयारी असलेल्यांना राहुल गांधी यांनी महत्त्वपूर्ण संदेश देत इशारा दिला आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना संघाचे लोक म्हटलं आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया आघाडीसोबत राहुल गांधी यांची बैठक झाली. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसला धाडसी लोकांची आवश्यकता असून भित्र्यांची गरज नाही. जे लोक संघाची विचारधारा पाळतात त्यांची पक्षाला गरज नाही. अशा लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
देशात अनेक लोक धाडसी आहेत. मात्र ते काँग्रेसमध्ये नाही. त्यांना पक्षात आणण्याची गरज आहे. पक्षातील जे लोक घाबरतात, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असं राहुल गांधी यांनी नमूद केलं.
बहुत सारे बाहरी नेता हैं जो डर नहीं रहे बीजेपी-आरएसएस से, उन्हें पार्टी में लाओ और जो हमारे यहां डर रहे हैं, उन्हें भगाओ, आरएसएस के हो तो जाओ मजे लो…हमें जरूरत नहीं है तुम्हारी: राहुल गांधी pic.twitter.com/71G97nupit
— NBT Hindi News (@NavbharatTimes) July 16, 2021
राहुल गांधी यांच्या निशाण्यावर ज्योतिरादित्य सिंधीया, जितिन प्रसाद हे नेते होते. ही दोघं काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त काँग्रेसमध्ये बंडखोरीच्या तयारीत असलेल्या लोकांसाठीही राहुल गांधी यांचा हा इशारा असल्याचे बोललं जात आहे.