राज्यात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरु आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतील पक्षांचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे भाजपला त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही लढत भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील पक्ष अशीच असणार आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी शिंदे-भाजप सरकारवर आक्रमक टीका केली आहे.
अंबादास दानवे ( Ambadas Danve ) हे सध्या धुळे दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. दानवे म्हणाले की, “जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन येतात दोन दिवस थांबतात आणि निघून जातात. यावेळेत ते फक्त फोडाफोडीचे राजकारण करतात. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांचे काहीही देणे घेणे नाही” अशी टीका दानवेंनी केली.
राज ठाकरे ऋतुजा लटकेंना पाठिंबा देणार? शिवसेनेचे अरविद सावंत म्हणाले, “त्यांनी आम्हाला…”
यावेळी बोलताना दानवेंनी ( Ambadas Danve ) सरकार आणि मंत्र्यांवरही जोरदार टीका केली आहे. दानवे म्हणाले की, “शिंदे-भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आणि त्यांच्या आत्महत्त्येचे काहीही गांभीर्य नाहीय. या सरकारमधील मंत्र्यांना फक्त सत्तेचा माज आला आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना योग्यरीत्या कोणतीही मदत पुरवलेली नाही. या सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर मदत पुरवली असती तर त्यांच्या आत्महत्त्या कमी झाल्या असत्या. त्याचबरोबर अजूनही कित्येक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे या सरकारला आणखी किती आत्महत्त्या पाहायच्या आहेत?” असा सवालही दानवेंनी विचारला आहे.
Andheri By-Election: शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधवांनी ‘त्या’ पत्रामुळे मानले राज ठाकरेंचे आभार
त्याचबरोबर अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली. दानवे म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या व्यक्तिगत कामातून वेळ मिळत नाहीय. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याबाबत विरोधी पक्षासोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून यात शेतकऱ्यांचाच तोटा होत आहे.” असेही दानवे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.