मुंबई – सेटवर 60 वर्षांवरील कलाकारांना मज्जाव करण्याच्या निर्णयावरून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी राज्य सरकारला रोष व्यक्त केला आहे. कलाकारांसाठी असा नियम असेल, तर मग 60 वर्षांवरील नेत्यांनी राजीनामे द्यावेत, अशी रोखठोक भूमिका विक्रम गोखले यांनी मांडली.
विक्रम गोखले म्हणाले, जवळपास तीन महिन्यांच्या लॉकडाउनंतर सरकारने काही अटी-शर्तींसह चित्रीकरणाला सुरुवात करण्यात परवानगी दिली. मात्र काही नियमांमुळे ज्येष्ठ कलाकार आणि निर्मात्यांची चांगलीच गोची झाली आहे. 60 वर्षांपुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणाची परवानगी नसल्याने त्यांच्या भूमिकांचे काय करायचं, असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे.