Lata Mangeshkar Death Anniversary : भारत देशाला लाभलेलं गोड आवाजचं रत्न म्हणजे लता मंगेशकर… आज लतादीदींना जाऊन २ वर्ष उलटली तरीही त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्या कायम सर्वांच्या मनात जीवंत आहेत. आज त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्याशीसंबधीत रंजक किस्से जाणून घेऊ.
लता दीदींनी लग्न का केले नाही?
लता मंगेशकर या आयुष्यभर कुमारी राहिल्या, दीदींनी कधीही लग्न केले नाही. लता दीदी १३ वर्षांची असताना त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. यानंतर त्यांनी घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यामुळेच दीदींनी लग्नाचा विचारही केला नाही.
लतादीदींची बहीण मीनाताई मंगेशकर यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता.त्यांनी पुढे सांगितले,’आम्हाला सोडून दूर जायचे नाही.’ असे दीदी नेहमी म्हणत असे. म्हणूनच दीदींनी लग्न केले नाही. लता मंगेशकर यांना पाच भाऊ आणि बहिणी आहे. मीना खांडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे सर्व लतादीदींपेक्षा लहान होते. त्या कुटुंबातील सर्वात थोरल्या होत्या.
वयाच्या ५ व्या वर्षी गायला सुरुवात
लता दीदींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वयाच्या ५ व्या वर्षी दीदींनी गायन शिकायला सुरुवात केली. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. लता दीदींनी वडिलांकडून गायनाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे वडील उत्कृष्ट शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते. लता मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ‘पहिली मंगळागौर’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि त्यांची पहिली कमाई 25 रुपये होती. वयाच्या १८ व्या वर्षी लताजींना मास्टर गुलाम हैदर यांच्या ‘मजबूर’ चित्रपटातील गाण्याने ओळख मिळाली. या चित्रपटात लताजींना मुकेशसोबत गाण्याची संधीही मिळाली. ‘अंग्रेजी छोरा चल गया’ असे या चित्रपटाचे बोल होते. यानंतर लता मंगेशकर यांनी भारतीय भाषांमध्येच नाही तर काही परदेशी भाषांमध्येही गाणी गायली आहेत. दीदींनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली
लता मंगेशकर यांचीही एक इच्छा होती, जी त्यांना हयात असताना पूर्ण करायची होती. पण हे शक्य झाले नाही. मात्र, त्यांच्या निधनानंतर लता दीदींच्या कुटुंबीयांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. लतादीदी या बालाजीच्या भक्त होत्या आणि त्यांना तिरुमला तिरुपती देवस्थान त्यांना 10 लाख रुपये दान कण्याचे होते इच्छित होत्या. लता दीदींनीही आपल्या मृत्यूपत्रात ही इच्छा नमूद केली होती. हयात असताना त्यांना हे शक्य नव्हते, पण लता दीदींच्या कुटुंबीयांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे.होय, लता मंगेशकर यांची ही शेवटची इच्छा त्यांच्या मृत्यूच्या 611 दिवसांनी पूर्ण झाली.