मुंबई – देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, त्यांचे कौतुक सुद्धा होत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका यामध्ये आहेत.
या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. अश्यातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक खुलासा आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी गाणं गाणार होत्या असं त्यांनी म्हंटल आहे.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की….” या चित्रपटात एकही गाणं नाहीय हे फार वाईट आहे. कथा चांगली असून हा चित्रपटमध्ये त्या हत्याकांडामध्ये बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे. मी खरं तर या चित्रपटासाठी एक बोली भाषेतील गाणं काश्मिरी गायकेकडून रेकॉर्ड करुन घेतलं होतं. लतादिदींनी ते गाणं गावं अशी आमची इच्छा होती.
#TheKashmirFiles is SENSATIONAL… *Week 2* trending is THE HIGHEST in *post pandemic era*, OVERTAKES #Sooryavanshi, #83TheFilm and #Hollywood giant #SpiderMan BY A RECORD MARGIN… [Week 2] Fri 19.15 cr, Sat 24.80 cr, Sun 26.20 cr, Mon 12.40 cr. Total: ₹ 179.85 cr. #India biz. pic.twitter.com/acRcpbP7XA
— taran adarsh (@taran_adarsh) March 22, 2022
पण त्यांनी बऱ्याच काळापूर्वी चित्रपटांमध्ये गाणं बंद केलं होतं. त्या पार्श्वगायनामधून निवृत्त झाल्या होत्या पण आम्ही त्यांना विनंती केलेली. त्यांचे पल्लवीशी (पल्लवी जोशी) फार चांगले संबंध होतं. त्यांनी होकार सुद्धा दिला होता. कश्मीर वर लतादीदींना खूप जिव्हाळा होता. तसेच करोनाची लाट कमी झाल्यानंतर गाणं रेकॉर्ड करू, असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र, त्यांनी आपल्या निरोप घेतला आणि ते सर्व राहून गेलं. असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.
हा चित्रपट 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या चित्रपटातून झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे विशेष कौतुक केलं असून, सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होत. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यानंतर चांगलंच राजकारण तापलं होत.