मुंबई : गुजरात सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयावरून आता देशभरात प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे. यातच भाजप पक्षातील नेत्यांकडून राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची मागणी होत असतांना आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वर्षां गायकवाड यांनी म्हणाल्या की,’राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही.
त्या पुढे म्हणाल्या,’भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश असून मुलांच्या मानात शालेय अभ्यास क्रमातून हे रुजवले पाहिजे तसेच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे ही राज्य सरकारची भूमिका आहे. आणि भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. एका धर्माच्या ग्रंथाचा शिक्षणात समावेश केला तर, इतर धर्मीयांकडूनही तशी मागणी होईल. शाळेतील अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार नाही. धर्मग्रंथांचे पठन घरात करावे, शालेय शिक्षणात त्यांचा समावेश करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.’
दरम्यान,’भगवद्गीता हे जीवन जगण्याचे एक सुत्र आहे. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यासारखे संत साहित्याचा समावेश शालेय शिक्षणात केला पाहिजे. जेणेकरुन महाराष्ट्रातील भावी पिढी संस्कारक्षम होईल ; त्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याचं ज्ञान असेल !’ अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती.