प्रमोद ठोंबरे
बारामती, – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण रुजू झाले आहेत. यामुळे काही महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटी सेवा पूर्ववत झाली आहे. बारामती एसटी आगारातील 95 टक्के कामगार कामावर रुजू झाले आहेत. पूर्ण क्षमतेने एसटी सुरू झाले असल्याचे आगारप्रमुख अमोल गोंजारी त्यांनी सांगितले. लालपरी धावू लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बारामती आगाराची लालपरीची धाव राज्यभरात व्यापून गेली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यांपासून संप पुकारला होता.
तसेच संपकऱ्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयात उच्च सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आहे. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे निर्देश दिले. यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर परतण्याचा ओघ वाढला असल्याचे दिसून येते. सध्या बारामती एसटी आगारात एकूण 176 चालक तर 143 वाहक कार्यरत आहेत. त्यापैकी 171 चालक व 138 वाहक कामावर रुजू झाले आहेत. तीन दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच शंभर टक्के कामगार कामावर रुजू होतील. शटल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या नियमित सुरू झाल्या आहेत.
बारामती एसटी आगारातून शटल सेवेचा लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. इंदापूर ,वालचंदनगर भिगवण, दौंड, नीरा, फलटण, जेजुरी शटल तर अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, श्रीरामपूर, मोहटादेवी,रावेर ,औसा, बार्शी, नांदेड, अक्कलकोट ,सोलापूर, हैदराबाद, पंढरपूर, तुळजापूर, मंगळवेढा, सांगोला, जत, आटपाडी, आदी लांब पल्ल्याया गाड्या सुरू झाल्या आहेत.
– अमोल गोंजारे, आगार प्रमुख, बसस्थानक, बारामती.