नवी दिल्ली – हिटमॅन रोहित शर्मा हाच भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे, असे धक्कादायक मत विराट कोहलीचे पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका पराभवानंतर कोहलीने भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रोहितसह लोकेश राहुल, ऋषभ पंत यांची नावेही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.
भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहितव्यतिरिक्त एकही खेळाडू मला प्रगल्भ वाटत नाही. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व अत्यंत यशस्वी सिद्ध केले आहे. त्यामुळे एकदिवसीय व टी-20 संघांसह आता कसोटीसाठीही रोहितकडेच नेतृत्व सोपवणे योग्य ठरेल, असेही राजकुमार म्हणाले.