चेन्नई :- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत संघाचे तीन फलंदाज लागोपाठ बाद झाल्याने कोहलीला साथ देण्यासाठी मला खेळपट्टीवर जावे लागले. मात्र, ज्यावेळी आम्ही एकत्र आलो तेव्हा कोहलीने मला पहिली काही षटके कसोटी क्रिकेट खेळत आहेस असे समजून फलंदाजी कर, कोणताही धोका पत्करु नको. एकचा चेंडूच्या दीशा, टप्पा, वेग व स्विंगचा अंदाज आली मग नैसर्गिक खेळ कर, असा कोहलीने दिलेला सल्ला अत्यंत महत्वाचा ठरला, असे लोकेश राहुलने म्हटले आहे.
त्याने कोहलीसह दीडशतकी भागीदारी करत भारताला विजय मिळवून देणारी भागीदारी केली, त्यानंतर राहुलने कोहलीच्या सल्ल्यामुळेच हा सामना भारतीय संघ जिंकू शकला असे म्हटले आहे.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतानं पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली . सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला . या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत.