मुंबई – विराट कोहली कर्णधारपदाच्या जबाबदारीतून आता मुक्त झाला असल्यामुळे तो प्रतिस्पर्धी संघांसाठी जास्त धोकादायक ठरेल, असा इशारा विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी दिला आहे.
कोहली ज्या आत्मविश्वासाने 2016 साली खेळत होता व त्या काळात त्याने जे सातत्य दाखवले होते तेच आता दिसू शकेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्याची जिद्द, संयम व योग्य वेळी गिअर बदलून आक्रमक फलंदाजी करण्याची गुणवत्ता यांचा मी पूर्वीपासूनच चाहता होतो.
त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी होती तेव्हा त्याची वैयक्तिक कामगिरी कमी पडताना दिसली. आता तसे होणार नाही व तो येत्या काळात लवकरच मोठी खेळी करून टीकाकारांची तोंडे बद करेल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला.