नवी दिल्ली – भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली येत्या पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर करेल, असा दावा माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा यांच्यासह अन्य काही खेळाडूंनी केला आहे.
टी-20 संघाचे नेतृत्व कोहलीने सोडले तर, एकदिवसीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतले गेले. आता तर त्याने कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले. आता पुढील काळात तो केवळ एक खेळाडू म्हणून संघात असेल. ही परिस्थिती अनेकांना हाताळता येत नाही.
तसेच मुळातच आक्रमक स्वभावाच्या कोहलीला अन्य कोणा खेळाडूच्या नेतृत्वात खेळणे जमेल का हा मोठा प्रश्न आहे, असेही चोप्रा यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी पाच वर्षांनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करेल, असेही त्यांनी नमुद केले.