नवी दिल्ली – केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेचे उद्दिष्ट 81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा देणे असून 5 वर्षांसाठी खर्च अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये आहे.
पुढील वर्षी दिनांक 1 जानेवारी पासून 5 वर्षांसाठी पीएमजीकेएवाय अंतर्गत तांदूळ, गहू आणि भरड धान्य उपलब्ध करून दिल्याने गरीब आणि असुरक्षित घटकांना लाभ होईल.
एक देश एक शिधा पत्रिका या उपक्रमांतर्गत लाभार्थींना देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी मिळेल . स्थलांतरीतांना राज्यांतर्गत आणि आंतरराज्य सुवाह्यता पात्रता मिळवून देण्यात येणार आहे.