पिंपरी – मुलीचा विवाह आपल्यासोबत करून न दिल्याचा राग मनात धरुन एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसोबत मुलीच्या वडिलांचे अपहरण केल्याचा धक्कादाय प्रकार साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडला.
काळूराम मारुती हुलावळे (वय 55, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास वाघमारे आणि त्याच्या दोन मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाम मोरेकर (वय 30) हे फिर्यादी हुलावळे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. मोरेकर यांनी त्यांच्या मुलीचे लग्न आरोपी विलास याच्यासोबत लाऊन दिले नव्हते. त्याचा राग विलासच्या मनात होता.
त्यावरून सोमवारी रात्री विलास आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून मोरेकर यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून पळवून नेले आहे.