मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. रणबीर आणि आलिया हल्ली नेहमी एकत्र दिसतात. दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीही जाहीर वाच्यता केलेली नाही. परंतु त्या दोघांचं सतत एकत्र असणं, एकमेकांच्या घरी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणं, बाहेर फिरणं यावरुन ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, अशा बातम्या नेहमी येत असतात.
View this post on Instagram
हे दोघेही या वर्षी लग्न करणार आहेत. अशा बातम्या सुरुवातीला आल्या होत्या. परंतु एप्रिल महिन्यात रणबीरचे वडील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यानंतर या बातम्या थांबल्या. तर काहींनी त्यांचं लग्न या वर्षाच्या शेवटी होईल, असं म्हटलं होतं.
मात्र रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाला होता की, तिच्यासोबत असणारे नाते हे अगदी नवी आहे.
त्याबाबत फार काही बोलायचे नाही. अतिशय खास अशा या नात्याला फुलण्यास, बहरण्यास वेळ देण्याची गरज असल्याची बाब त्याने पुढे सांगितली.
नवी व्यक्ती, नवे स्वभाव, काही जुन्या गोष्टींमध्येही येणारं नाविण्य हे मुद्दे त्याने अधोरेखित केले होते. आपण या नात्यांकडे अतिशय सकारात्मक आणि संतुलित दृष्टीकोनातून पाहत असल्याचे त्याने सांगितले.