नवी दिल्ली – दिल्ली मेट्रोच्या उद्घाटनाला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना केंद्र सरकारने निमंत्रण दिले नाही, त्यातून त्यांची संकुचित मानसिकता दिसते अशी टीका दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केली आहे.
पतंप्रधानांनी अशा कार्यक्रमाच्या संबंधात पक्षाच्या पातळीबाहेर जाऊन वर्तन करणे अपेक्षित आहे त्यांनी अशा कार्यक्रमात राजकारण करणे योग्य नाही असेहीं त्यांनी म्हटले आहे.
आज मोदींच्या हस्ते द्वारका सेक्टर 21 स्थानक ते यशभूमी द्वारका सेक्टर 25 स्थानकापर्यंत विमानतळ एक्सप्रेस मेट्रो मार्गाच्या सुमारे 2 किमी विस्ताराचे उद्घाटन करण्यात आले.
त्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणे गरजेचे होते असे आप चे म्हणणे आहे. अतिशी म्हणाल्या की या मेट्रो प्रकल्पासाठी केवळ केंद्र सरकारच निधी देते असे नाही तर निम्मा निधी दिल्ली सरकारी देत आहे.
हा 50-50 टक्के निधी सहभागाचा प्रकल्प आहे, त्यामुळे केजरीवालांना निमंत्रण देणे गरजेचेच होत असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान हे देशाचे पालक असतात त्यांनी अशा पातळीचे राजकारण करणे योग्य नाही असे त्या म्हणाल्या.