मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून या आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांतच्या फॅन्स च्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
आत्तापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे. तसेच, आणखी आरोपांची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी पाटणा शहर एसपी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची टीम मुंबईला पाठवली आहे.
आता बास्स झालं.. @MumbaiPolice तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी negative बातम्या सुरू आहेत. कुणीही येतय आणि टिकली वाजवून जातय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या #SushantSinghRajputDeathCase प्रकरणाचा समारोप करा!!!! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे. @CMOMaharashtra
— Kedar Shinde (@mekedarshinde) August 2, 2020
दरम्यान, मराठी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे. शिंदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर आपले मत व्यक्त केले आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे, “आता बास्स झालं… मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी नकारात्मक बातम्या सुरु आहेत. कुणीही येतंय आणि टिकली वाजवून जातंय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा समारोप करा! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे.’ अशी सडेतोड भूमिका केदार शिंदे यांनी मांडली आहे.