सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर परिसरात आज पावसाने (दि. २४) दुपारी 3 च्या सुमारास दमदार हजेरी लावल्याने करंजे येथील ओढ्याला पाणी येऊन तो तुडुंब भरलेला आहे. गेल्यावर्षी झालेल्या पावसाने असाच हा करंजेचा ओढा तुडुंब झाला होता.
सोमेश्वरपरिसरातील चौधरवाडी ,रासकर मळा ,करंजे करंजेपुल, मुरूम, वाणेवाडी ,होळ, वाघळवाडी, निंबुत या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान होऊ शकते, परंतु पडलेल्या पावसाने थोडे दिवस का होईना पिकाच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नागरिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.