मुंबई- मी वाद सुरु करत नाही ते संपवण्याचा प्रयत्न करते, असं वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने केलं आहे.गेल्या काही दिवसात कंगना राणावत चर्चेचा विषय ठरली आहे. तिने केलेल्या एका ट्विटमुळे सगळ्या वादाला तोंड फुटलं आहे. यावेळीही तिने ट्विट करत मी वाद सुरु करत नाही ते संपवण्याचा प्रयत्न करते हे वक्तव्य केलं आहे.
मला भांडखोर मुलगी समजलं जातं , पण ते खरे नाही. मी आतापर्यंत स्वत: कधीही भांडण सुरु केलेले नाही. जर तसं कुणी सिद्ध केले तर मी ट्विटर बंद करेन. मी भांडण सुरु करत नाही, तर नेहमी ते संपवण्याचा प्रयत्न करत असते. कृष्णाने सांगितले आहे की, जर कुणी तुम्हाला लढण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर त्यांना नाही म्हणू नका, असं तिने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
मागील काही दिवसापासून कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद सुरु झाला होता. मुंबईत आता सुरक्षित वाटत नाही, मुंबई आता पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटायला लागली आहे. असे विधान केल्यानंतर कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
दरम्यान, फक्त चाहत्यांकडूनच नाही तर अनेक कलाकारांनी ट्विटरवर कंगनाला चांगलेच सुनावले होते. त्यानंतर तिच्या विरोधात अनेक ट्विटसुद्धा केले.