kalicharan maharaj – अकोल्याचे कालिचरण महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे वादात अडकत असतात. यापूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती, त्यानंतरही त्यांनी अनेकदा धर्मावरून वादग्रस्त विधान केले आहे.
अशात आज पुन्हा त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. कालीचरण महाराज म्हणाले,’राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत. २० वर्षानंतर त्यांची संख्या वाढली तर ते तसं करतील, महंतांनी देखील भीती व्यक्त केली आहे. असं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. कालिचरण महाराज पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिरात महाआरतीसाठी आले होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
तत्पूर्वी, इस्लाम धर्माविषयी बोलताना ते म्हणाले कि होते, ‘इस्लाम हा धर्मच नाही..हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे’, हिंदूंना जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं. मुस्लिमांचे 100 टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं. जर आई-बहिणींना वाचवायच असेल तर ते फक्त राजनीतीनेच वाचविता येऊ शकतं. म्हणून मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे, जो हिंदू हिताची गोष्ट करेल त्याला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.