मुंबई – कालीचरण महाराज नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. तर आता ठाणे येथे टीव्ही माध्यमांशी बोलतांना त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,’“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा हा छत्रपतींचा आदर्श आहे” असं विधान कालीचरण महाराज यांनी केलं आहे.
पत्रकरांशी बोलतांना कालीचरण म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करणे हा आदर्श घालून दिला आहे. तेव्हा सर्वानीच राष्ट्ररक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र उचललं पाहिजे.’
ते पुढे म्हणाले,’ गीतेमध्येही सांगितल्यातले आहे, त्यामुळे आपण आदर्श धारण केला पाहिजेत. राष्ट्ररक्षणसााठी आपण हिंसक बनायला हवं. जशी आपली सेना आहे. याशिवाय उपाय नाही” असंही महाराज म्हणाले.
दरम्यान, छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील धर्मसंसदेमध्ये कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर कालीचरणला छत्तीसगड पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या.