बॉलीवूड सोबतच टॉलीवूडमध्ये देखील अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल गेल्या वर्षीच गौतम किचलूला सोबत लग्नबंधनात अडकली आहे. याशिवाय काजलने तिच्या लग्नादरम्यान हे स्पष्ट केले होते की, ती चित्रपट करणार आणि चाहत्यांचे मनोरंजन करत राहणार आहे. आता मात्र काजल चित्रपटात काम करणार नसल्याचे तिने एक मुलाखतोत बोलले आहे. यामुळे चाहतेही गोंधळात पडले आहेत.
काजलने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, ती अभिनय सोडून देऊ शकते. या मुलाखतीतील वृत्तानुसार, काजल अग्रवाल म्हणाली की, “जर तिचा पती तिला चित्रपट करण्यास मनाई करेल, तर ती त्वरित अभिनय करणे थांबवेल’. काजल पुढे असेही म्हणाली की, “ती नवीन चित्रपट साइन करत नाहीये, तर ती केवळ साईन केलेल्या तिच्या जुन्याच कॉंट्रॅक्टवर लक्ष देत आहे’.
काजल अग्रवाल लवकरच चिरंजीवी अभिनीत चित्रपट “आचार्य’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोरतल्ला शिवा आहे. याशिवाय ती “इंडियन 2′ आणि “हे सिनामिका’ या तमिळ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नवऱ्याने मनाई केली म्हणून यापूर्वी भाग्यश्री पटवर्धननेही फिल्म इंडस्ट्री सोडून दिली होती.