गेल्या महिन्यापासून सुरू होते आवर्तन
जुन्नर (प्रतिनिधी) – कुकडी उन्हाळी आवर्तनासाठी माणिकडोह धरणातून गेल्या १३ मार्चपासून सुरू असलेला विसर्ग उद्यापासून (सोमवार, दि. १३) दुपारपासून बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत ३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणात सुमारे ११ टक्के उपयुक्त पाणीसाठा (१.२५) शिल्लक राहणार आहे. जुन्नर शहर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी माणिकडोह धरणातील १ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. सदर आवर्तन प्रशासकीय नियोजनाप्रमाणे थांबविण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी सांगितले आहे.
श्रीगोंदा, पारनेरकरिता उन्हाळी आवर्तनासाठी माणिकडोह येथून १२००, पिंपळगाव जोगा धरणातुन २०० आणि डिंभे डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्सने पाणी येडगाव साठ्यात जमा होत आहे. हे आवर्तन पुढील १०-१२ दिवसांत संपणार आहे.
कुकडी प्रकल्पातील धरणांतील आजचा उपयुक्तसाठा; टीएमसी व टक्केवारी.
माणिकडोह – १.२० / ११.८३%
वडज – ०.४० / ३४.५४%
पिंपळगाव जोगा – ०.५१ / १३.१५%
डिंभे – ६.९६ / ५५.७८%
चिल्हेवाडी– ०.६२ / ७७.३४%