जामखेड : माणसाचे शरीराआधी मन आजारी पडतं तेव्हा चांगल्या स्वस्थ शरीरासाठी मन सांभाळा. माणूस म्हणून जगण्यासाठी मनातील द्वेष काढून टाका. समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करतात त्यांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबांची आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदाताई पवार पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून बारामती एग्रोच्या वतीने ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पत्रकारांसाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरासह तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या गोष्टीवर लक्ष ठेऊन निर्भीड लिखाण करावे. विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी मदत करावी. पत्रकारांनी समाजात स्वास्थ्य आणि सलोखा राखायला मदत करायला हवी. पत्रकारांनी निर्भिड आपली लेखणी वापरावी असे नट्या म्हणाल्या. पत्रकारांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन सर्वाना न्याय द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधूकर राळेभात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, काँग्रेसचे नेते रमेश आजबे, हास्य कवी मकरंद ,तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार सहकुटुंबसहित उपस्थित होते.