नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेला हिंसाचार पाहिल्यानंतर मला 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याची आठवण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी करून या मगील सुत्रधारांना अटक केली पाहीजे, अश मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेवे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.
जेएनयुत रविवारी सुमरे 100 गुंडांनी प्रवेश केला. त्यांनी जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषा घोष हिच्या सह सुमारे 34 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. त्याबाबत ठाकरे म्हणाले, मला मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण या हल्ल्याने झाली. तोंड बांधून आलेले हे हल्लेखोर कोण होते हे शोधायला हवे. देशातील विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यांना विश्वास द्यायला आम्ही एकत्र आले पाहिजे.
दरम्यान, विद्यापीठाचे शिस्तपालन अधिकारी धनंजय सिंग यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. विद्यापीठाचे आवार सोडून जाऊ नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठात सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.