रांची – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की झारखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत आहे परंतु आदिवासींसाठी ‘सरना’ धार्मिक संहितेला मान्यता देण्याचा जो निर्णय केंद्राकडे प्रलंबित आहे त्यावर त्यांनी झारखंड दौऱ्यात निर्णय घोषित केला पाहिजे.
पंतप्रधान मोदी 15 नोव्हेंबर रोजी आदिवासींचे नेते बिरसा मुंडा यांच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहाटू या गावाला भेट देणार आहेत, हा दिवस’जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो, तसेच तो झारखंड राज्याचा स्थापना दिवस देखील आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितले की, या राज्यांतील अदिवासींसाठी सरना ही स्वतंत्र धार्मिक संहिता लागू करण्याच्या मागणीच्या संबंधातील सर्व कागदपत्रे केंद्र सरकारकडे सादर करण्यात आली आहेत.
यावर केंद्र सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे. येथील अदिवासी हे देशातील इतर धर्मांच्या अनुयायांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र घटनात्मक अधिकार दिले गेले पाहिजेत. या अधिकारांची संहिता याच सरना संहितेत आहे.