वडूज – खेडेगावातून येऊन मोठ्या शहरात कर्तबगारी दाखविणे फार मोठे अवघड काम आहे, असे मत माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
मुळीकवाडी (ता. खटाव) येथील पुकळे बंधूंनी पुणे येथील सिंहगड रोडवर वैष्णवी उद्योग समूहाच्यावतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खडकवासल्याचे आ. भीमराव तापकीर, खटावचे माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, कुमारभाऊ गोसावी, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, नगरसेवक हरिदास चरवड, ज्योतीताई गोसावी, नीताताई दांगट, श्रीकांतभाऊ जगताप, राजाभाऊ लायगुडे, सुरेशराव लवटे, दयानंद तेलंगे- पाटील, विकास दांगट, काकासाहेब चव्हाण, सचिनभाऊ निवंगुणे, पै. आप्पासाहेब आखाडे, विलासशेठ कांकरिया, सुरेशशेठ तोलगेकर, संजीव साळुंखे, शैलेश चरवड, लिलाधर रोझतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. गोरे म्हणाले, खटाव- माण तालुक्यातील युवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वेगवेगळ्या क्षेत्रांत संपूर्ण देशभर नावलौकीक वाढविला आहे.
भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने कर्तबगार उद्योग- व्यावसायिकांचा मोठा अभिमान आहे. डॉ. येळगावकर म्हणाले, व्यवसायातील सचोटी व प्रामाणिकपणाच्या आधारावर अलिकडच्या काळात पुकळे बंधूंनी गरुडझेप घेतली आहे. व्यवसायाबरोबर सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे त्यांनी पुण्यासारख्या मोठ्या शहरात दबदबा निर्माण केला आहे. माजी सरपंच बाळासाहेब पुकळे, जीवनशेठ पुकळे यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास ग्राहक पंचायतीच्या जिल्हा पदाधिकारी डॉ. सौ. उर्मिला येळगावकर, पंचायत समिती माजी सदस्या सौ. मेघाताई पुकळे, सौ. रेणू येळगावकर, आदिती देशपांडे, मधुकर पुकळे, शहाबाई पुकळे, स्वाती पुकळे, शिवतेजराजे पुकळे, शुभम पुकळे, वैष्णव पुकळे, वेदांग पुकळे, कृष्णतेज पुकळे आदी उपस्थित होते. प्रा. सचिन लवटे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच चंद्रकांत ओवे यांनी आभार मानले.