मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, तो 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य आव्हाड यांनी शिर्डीमध्ये केले यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्यांनीही त्यांच्या या विधानानंतर संताप व्यक्त केला आहे. अशात अयोध्या येथील जगद्गुरु श्री श्री जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज प्रचंड संतापले आहे. त्यांनी आपण स्वंय जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु आहे.
ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’राज सरकार आणि केंद्र सरकार मिळून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करणार नसेल तर “मैं स्वयं उसको मार डालूंगा, हमे चाहे फासी होने दो, संत समाज डरता नही है, इस तरह से अकबर के भक्तो को खुश करने की कोशिश की जा रही है,” असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांना संत समाज माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तर वादग्रस्त विधानांवर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले,’मी महाराष्ट्राला नेहमीच संबोधित करत आलोय तसेच मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही, इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेले’ असेही ते म्हणाले आहे.