मुंबई – भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत कॉंग्रेसला दूर ठेवणे योग्य ठरणार नाही. कॉंग्रेसला बरोबर घेऊनच ती प्रक्रिया पुढे नेण्याची आमची इच्छा आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मांडली.
भाजपशी राजकीय संघर्ष करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचा सूर आळवला जात आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव सक्रिय झाल्याचे दिसते. मात्र, ते कॉंग्रेसला बरोबर घेण्याविषयी फारसे उत्सुक नसल्याचीही चर्चा झडत असते. अशात ममतांनी काही दिवसांपूर्वी भाजपेतर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना एक पत्र पाठवले.
त्यामधून त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्या पत्राविषयी पत्रकारांनी विचारल्यावर ममतांनी बोलणे झाल्याचे त्यांनी नमूद केले. इतर नेत्यांशी अद्याप आमची चर्चा व्हायची आहे. बैठकीसाठी तारीख आणि ठिकाण ठरवावे लागेल, असे ते म्हणाले. अर्थात, विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत कॉंग्रेसला दुर्लक्षून चालणार नसल्याचेही त्यांनी सूचित केले.